ओबीसी समाजाचा अत्यंत संयमाने एल्गार, पडळकर यांचे आवाहन

मेळ्याव्यामधे आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका गोपीचंद पडळकर यांनी मांडली आहे. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत या सुरु असलेल्या आंदोलनास गोपीचंद जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला असल्याचे यांची व्हिडिओ करत नमूद केले आहे.

कीव येत आहे
गोपीचंद यांनी सांगितले की, या भेकडांनी परत नौटंकी करत मीडिया मध्ये मुलाखती दिल्या आणि  म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते असदेखील त्यांनी म्हटले आहे.

भूमिका स्पष्ट आहे
मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे.

नक्की सूत्रधार कोण?
यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहितेय कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे. काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

पडळकर यांचे आवाहन
यावेळी पाडळकर यांनी आवाहन केले आहे, ‘माझ्या ओबीसी बांधवांना  हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. कारण आपल्याला डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी  येत्या ११ तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे.त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा.’

त्यामुळे आता अधिवेशनात हा मुद्दा कसा गाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment